

वर्धा : धार्मिक दृष्टीने महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या तालुक्यातील पवनूर येथे गळाची रथयात्रा महोत्सवाचे आयोजन चैत्र कृष्ण पक्ष पंचमी १७ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. या रथयात्रेला 3०६ वर्षाची परंपरा आहे. ही रथयात्रा दरवर्षीप्रमाणे मोठया उत्साहात साजरी केली जाते. पवनूर येथे गावाच्या शेवटच्या टोकावर पाताळ माता या देवीचे मंदिर आहे. हे मंदिर गावचे ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. या देवीवर भक्तांची निस्सीम श्रद्धा असून, या मंदिरात अश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्र साजरी करण्यात येते. चैत्र महिन्यात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गळाची रथयात्रा साजरी करण्यात येते. या रथयात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे गावावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून तसेच गावातील सामाजिक सलोखा अबाधित टिकून राहावा, यासाठी या यात्रेचे गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजन केले जाते.
एक लाकडी झुला लटकवून गावातील देवीभक्त अरुण लांडे आणि त्याचा सहकारी संपूर्ण गावात त्याची परिक्रमा काढली जाते. हा यात्रा महोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची लक्षणीय उपस्थिती असते. या यात्रा महोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त पवनूर येथील नागरिकांनी केले आहे. ही यात्रा महोत्सव यशस्वीतेसाठी अरुण लांडे, सुरेंद्र कारणकर, सागर कोंडलकर, प्रवीण चौधरी, रोशन पांडे, प्रमोद राऊत, मारोती तिवसकर, उत्तम डांगे, संकेत प्रदक्षिणा, संकेत ढाकुलकर, रवींद्र कारणकर, सुरज कडहू आदी पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत. तसेच या यात्रे दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये परिसरातील गावातील नागरिक मोठ्या भक्तीभावने कार्यक्रमात सहभागत घेत असतात.
तसेच यात्रेत सामाजिक प्रबोधानात्मक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येतात. यासाठी पंचक्रोशित नागरिक अनेक दिवसापासून तयारीसाठी लागले आहेत. अनेक समितीची स्थापना करून कामे वाटून दिली आहेत.
चित्त थरारक झुला
लाकडी बैलबंडीपासून ५० फूट उंचावर लाकडी झुला असतो. दोघेही सहकारी त्याला लटकवून संपूर्ण गावची प्रदक्षिणा करतात. या यात्रेचा समारोप पाताळ मातेच्या मंदिरात होते. या संपूर्ण गळाचा रथ सजविण्यासाठी गावातील स्थानिक गळ समिती असते. ती या गळाची आकर्षक सजावट आणि चित्त थरारक रथ तयार करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून झटत आहे.
महिनाभरापासून रथयाजेची गावकरी करतात तयारी
या रथयाजेला लागणारे दोर, लाकडी जू आदी वस्तू अतिशय प्रजब्रूतपणे गळाचा र॒थ तयार करण्यात येतो. हा रथ तयार करण्यासाठी मारोती दाभेकर, सतीश दाभेकर, धनराज कोंडलकर, अर्जुन भोयर, दिनेश कोंडनकर, दिनेश इंगळे, रमेश कडू, आशिष दाष्षेकर, विक्रम कडू, अनुप चौधरी, अरुण हजारे, खुशाल राऊत, मधुकर महात्मे, प्रणय कोंडलकर आदी कार्यकर्ते गेल्या एक महिन्यापासून झटत आहेत.
ग्रामदैवत पाताळदेवीला करतात पाणाऱ्यांचा नैवद्य
या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या मुली आवर्जून माहेरी येतात. यात्रेच्या दिवशी घरोघरी पाणग्यांचा नैवेद्य दाखवत्ना जातो. या यात्रा महोत्सवाचा प्रारंभ १० एप्रिलला झाला असून, त्याचा समारोप १७ एप्रिल रोजी रविवारी रथ याजेने होणार आहे. सायंकाळी ४:०० वाजता गळाची रथयान्रेला प्रारंभ होणार आहे. याभेला पंचक्रोशीतील भाविकांची लक्षणीय उपस्थिती असते, याञा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्यामुळे गावात नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे.