कारंजा (घाडगे) : तालुक्यातील लिंगा मांडवी येथील माधव मानमोडे यांचा मुलगा आदित्य मानमोडे हा शेतातील उभ्या कपाशीच्या पिकाला पाणी देत होता. दरम्यान, जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने आदित्यचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजता घडली.
आदित्य मानमोडे हा कारंजा येथे बारावीचे शिक्षण घेत होता. तो दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून आपल्या मूळ गावी परतला होता. स्वतःच्या शेतात तो कपाशीच्या उभ्या पिकाला पाणी देत असताना त्याचा विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श झाला. परिणामी आदित्य याचा विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसून मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने मानमोडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.