नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या युवकास अटक करीत तलवार जप्त

सेलू : तलवारीच्या धाकावर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक करुन तलवार जप्त केली. मोर्चापूर गावात ही कारवाई करण्यात आली. वैभव सुनील उमाटे हा तलवारीचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरवित होता. यामुळे नागरिकांना घराबाहेरही निघणे कठीण झाले होते. याची माहिती काही नागरिकांनी ठाणेदार सुनील आडे यांना दिली.

ठाणेदारांनी लगेच कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. त्यानुसार, अखिलेश गव्हाणे, मनोहर मुळे, नारावण वरठी, अमोल राऊत, अनिल कोल्हे, पंचभाई, सचिन वाटखेडे यांनी कारवार्ड केली. सध्या ग्रामीण भागातही नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचे लोण हळुळू पसरत चालले आहे. त्यामुळे पोलिसांनी याकडे आता लक्ष देत अशांवर कारवाई करण्यास गती दिली आहे. यापुढे कठोर कारवाई केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here