पेट्रोल पंप रदद व्हावा यासाठी वर्ध्यात विराट मोर्चा! आंबेडकरी कार्यकर्त्यांचा हजारोंच्या संखेने सहभाग

वर्धा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणारा पेट्रोल पंप रद्द व्हावा या मागणीकरीता वर्ध्यात आंबेडकरी संघटनांनी विराट मोर्चा काढला. जिल्ह्याभरातुन आंबेडकरी अनुयाी या मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता बजाज चौकात एकत्र येत या विराट मोर्चाला सुरवात झाली. यात हजारोंच्या संखेने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. पेट्रोल पंप हटाव, पोलिस प्रशासन मुर्दाबाद, जिल्हा प्रशासन मुर्दाबाद, पालकमंत्री मुर्दाबात अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला होता.

शहरातील पोलिस मुख्यालय येथे होत असलेल्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नसून त्या जागेला आहे. पेट्रोलपंप रद्द करावा, यासाठी आंदोलन केल्यानंतर पोलिसाकडून दुस-या जागेचा शोध सुरू असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले. मात्र बांधकाम सुरूच ठेवत संघटनांची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

सदर पेट्रोलपंप नियमाला धरून नसल्याने त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी सुनावणी घ्यावी असे सांगितले होते. परंतु सुनावणीशिवाय आर्डर काढला कसा, याठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून जवळच स्टेडियम आहे. विविध विभागाने दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र पोलिसांनी दबाव टाकून घेतले आहेत. 15 मीटर रुंद असणा-या रस्त्याची खोटी माहिती देऊन तो रोड मोठा असल्याचे सांगण्यात आले. असे करताना पोलिस प्रशासनाने दबाव टाकून नियमांना डावलून परवाना घेतल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी समजाकल्याण सभापती विजय आगलावे, बसपाचे मोहन राईकवार, किशोर खैरकार, महेंद्र मुनेश्वर, अभय कुंभारे, विशाल मानकर, तुषार उमाळे, आशीष सोनटक्के, अतुल दिवे, विशाल रामटेके, स्मीता नगराळे, नीरज गुजर, शारदा झामरे, राजदिप नगराळे, जयबुद्ध लोहकरे, विशाल नगराळे, रंजित धोंगडे, वैभव निखाडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, संभाजी ब्रिगेड, भिम आर्मी, भिम टायगर सेना, झळकारी सेना, निर्माण सोशल फोरम व संबुद्ध महिला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here