प्रेम गावंडे
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपूर शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या १७ जुलै ते २० जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण टाळे बंदी (लॉक डाऊन) केली जाणार आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील. ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी १७ ते २० जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये.चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार ह्यांनी केले आहे.