सोयाबीनची गंजी पेटविली! तीन लाखांचे नुकसान; शेतकऱ्याने पोलिसात नोंदविली तक्रार

सेवाग्राम : दहेगाव (मि.) येथील एका शेतात कापणीनंतर ढीग करून ठेवलेल्या सोयाबीनला आगीच्या हवाली करण्यात आले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

हमदापूर येथील शेतकरी सचिन किसना डोणे यांचे दहेगाव (मि.) शिवारात शेत आहे. त्यांनी यंदा सोयाबीनची लागवड केली. पिकाची योग्य निगा राखण्याने शेतकरी डोणे यांना समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा होती. अशातच कापणी झाल्यावर शेतातच सोयाबीन पिकाची गंजी करण्यात आली होती. पण त्याला अज्ञात व्यक्‍तीने आगीच्या हवाली केल्याने सहा एकरातील सोयाबीन पिकाची राखरांगोळी झाली आहे. या घटनेमुळे डोणे यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here