विवाहितेचा छळ! सासरच्यांविरुद्ध तक्रार

वर्धा : माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेस मारहाण करीत असल्याची तक्रार विवाहितेने रामनगर ठाण्यात दाखल केली आहे. विवाहितेचे लग्न सुनील वामन उईके याच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतर पती सुनील उईके, संतोष उईके, सुषमा उईके, माधुरे कुमरे यांनी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला. तसेच पैसे न आणल्यास घरातून बाहेर हकलण्याची धमकी देत विवाहितेला मारहाण केली. अखेर विवाहितेने कंटाळून याबाबतची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here