अखेर विकास कामात अडथळा ठरणाऱ्या अजस्त्र वृक्षांवर चालविला गजराज

वर्धा : दत्तपूर ते सेवाग्राम या मार्गाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या मार्गावर असलेल्या वृक्षांना तोडण्यासाठी पर्यावरण प्रेमीकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. सेवाग्राम मागविरील बहूतांश वृक्ष ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या काळातील असल्याने ती वृक्ष वाचविण्यात यावी, अशी मागणी गांधीवाद्यांकडून करण्यात आली.

या संदर्भात झालेल्या आंदोलनाची धग सातासमु्दापार पोहोचली. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी तसेच गांधीवादी यांच्या उपस्थितीत नव्याने वृक्ष सर्वेक्षण करण्यात आले. विकास कामात अडथळा ठरणार्‍या वृक्षांना तोडण्याचे काम त्यानंतर हाती घेण्यात आले. रविवारी दत्तपूर ते आरती चोक पर्यंतचे १५ वृक्ष तोडण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. यावेळी दोन्ही मार्गाची वाहतूक रोखण्यात आली होती. याप्रसंगी कुठलाही अतुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here