ब्रेकअपनंतर भररस्त्यात तरुणीचा केला विनयभंग! केसरीमल शाळेसमोरील घटना

वर्धा : भाजीपाला घेऊन जात असलेल्या तरुणीला रस्त्यात अडवून असभ्य वर्तन करीत विनयभंग केला. इतकेच नव्हे तर तिच्या मोबाइलवरून तिच्या भावासह आई-वडिलांशी बोलत तुमच्या मुलीचे लग्न कुणाशीही होऊ देणार नाही, असे म्हणत धमकीही दिली. ही घटना शहरातील केसरीमल शाळेसमोर घडली. या प्रकरणी दि. २३ रोजी शहर पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

२३ वर्षीय तरुणीचे आरोपी समीर नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण, काही महिन्यांपूर्वीच समीरसोबत तिने बोलणे सोडले होते. समीर तरुणीचा सतत पाठलाग करीत होता. शुक्रवारी तरुणी तिच्या मैत्रिणींसह केसरीमल शाळेसमोरील रस्त्यालगत असलेल्या भाजीच्या दुकानातून भाजी घेत असताना समीरने दुचाकी आडवी लावून तिला थांबवते तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हटले. तरुणीने नकार देत मोबाइल काढून तिच्या भावाला घडलेला प्रकार सांगत असतानाच समीरने मोबाइल हिसकावून तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबतच करून द्या, दुसऱ्या कोणासोबत मी होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. घाबरलेल्या तरुणीने शहर पोलिसांत तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here