सुशिक्षित बेरोजगार युवकांचे आक्रोश आंदोलन! MPSC, UPSC चे विद्यार्थी रस्त्यावर

वर्धा : राज्यातील सरकारी सेवांमधील भरती गेल्या काही काळापासून रखडली आहे. याविरोधात खदखद मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितेश कराळे यांच्या नेतृत्वात सुशिक्षित बेरोजगार युवकांनी येथील आंबेडकर पुतळ्याजवळ आज आक्रोश आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये एमपीएससी, यूपीएससीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्य सरकारे तात्काळ रखडलेली पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा घ्याव्या अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक परीक्षा रखडल्या आहेत. तर स्पर्धा परीक्षांमध्ये पास झालेल्यांच्या मुलाखतीसुद्धा रखडल्या आहेत. इंटरव्यू सुद्धा झाले नाही आणि त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. याच परिस्थितीमुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या 24 वर्षांच्या युवकाने आत्महत्या केली. MPSC च्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊनही त्याची तोंडी मुलाखत रखडली होती. त्याच्या आत्महत्येनंतर पावसाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पदे भरण्यात येतील, अशी घोषणा केली. पण सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांसह नितेश कराळे यांनी आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here