
वर्धा : मकत्याने दिलेल्या शेतीचे पैसे मागितले असता, महिलेस काठीने मारहाण करण्यात आली. नागरसेन नगर येथे ही घटना घडली. तानाबाई येसनकर यांनी बंडू भस्मे याला रोठा शिवारातील शेती मकत्याने दिली होती. मकत्त्याचे शिल्लक असलेले ११ हजार रुपये तानाबाई यांनी मागितले असता, बंडूने आता पैसे नाही, मला यावर्षी तोटा झाला, असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ केली. म्रहिला मागणीवर ठाम राहिल्याने तिच्या पावावर बंडूने काठीने मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखळ करण्यात आली आहे.