वर्धा : तू घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, असे म्हणून विविहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच शिविगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना नागपूर येथील तेळीपुरा येथून उजेडात आली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून प्रशांत मच्छींद्र जाधव, सुमनबाई मच्छींद्र जाधव, जयंत मच्छींद्र जाधव, हर्षा सचिन आठवले, मुरली संताराम जाधव सर्व रा. तेलीपुरा बजेरीया, नागपूर या पाच जणांविरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.