

वर्धा : जिल्ह्यातील एकाही वाळूघाटाचा लिलाव अद्यापही झाला नसला तरी सेलू तालुक्यातील सुरगाव शिवारात सध्या वर्धा आणि सेलू तालुक्यातील माफियांना वाळूचा हांडा लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सूर नदीपात्रातून हे माफिया दररोज वाळूचा वारेमाप उपसा करीत असून, काही वाळू माफिया नदीकाठावरील शेतकऱ्यांना गप्प राहण्यासाठी पैशांचे आमिष देत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. काही शेतकरी थेट लक्ष्मीदर्शनाचा योग साधत असल्याने वाळू माफियांचे चांगभलेच होत आहे. सुरगाव शिवारात धांदे यांच्या शेताजवळ सूर, वाघाडी तसेच धाम नदीचा संगम आहे. याच भागात सध्या चांगल्या प्रतीची वाळू पावसाळ्याच्या दिवसांत वाहून आली आहे. तीनहून अधिक महिन्यांपासून सेलू तसेच वर्धा तालुक्यातील काही वाळू माफिया स्थानिक लोकप्रतिनिधीला हाताशी घेऊन वानखेडे तसेच धांदे यांच्या शेताशेजारी असलेल्या नदीपात्रातून मनमर्जी वाळूचा उपसा करून वर्धा शहरासह सेलू तालुक्यातील विविध भागांत पुरवठा करीत आहेत.
गृहमंत्र्यांनी नुकताच वर्धा जिल्ह्याचा पर्यावरणाचा होतोय हास वाळू माफियांकडून नदीपात्रात अवैध उत्खनन करुन मनमर्जी वाळू उपसा केला जात आहे. यामुळे नदीचे पात्रच धोक्यात आले आह. अवैध उत्खनन करताना वाळू माफियांकडून परिसरातील वृक्ष तोडली जात असल्याने पर्यावरणाचाही हास होत आहे, दौरा करून वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.