भाजीपाल्याची पाच दुकाने जळून खाक! मध्यरात्रीची घटना; नागरिकांच्या मदतीने आगीवर मिळाले नियंत्रण: लगतची घरे थोडक्यात बचावली

वर्धा : अचानक लागलेल्या आगीत बोरगाव (मेघे) परिसरात असलेली पाच भाजीपाला विक्रीची दुकाने जळून खाक झाली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, पाण्याच्या टँकरसह नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

बोरगाव (मेघे) परिसरातील मुख्य मार्गावर फळविक्रेत्यांसह भाजीपाल्याची दुकाने आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांना अचानक आग लागली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच, परिसरात खळबळ माजली.

याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत उड्डाणपुलावरून जात असलेल्या पाण्याच्या टँकरला बोलावून आगीवर पाण्याचा मारा केला तसेच नागरिकांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्रिशमन दलाचा बंब दाखल झाला आणि आग विझविण्यात आली. अचानक लागलेल्या आगीत पाच भाजीपाल्याची दुकाने जळून खाक झाली.लगतची घरे मात्र, थोडक्यात बचावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here