क्षुल्लक कारणातून तिघांनी केली युवकास जबर मारहाण

हिंगणघाट : क्षुल्लक कारणातून वाद करीत तिघांनी युवकास जबर मारहाण केली, भीमनगर परिसरात ही घटना रितेश पाटील हा घरी असताना त्याच्या साडभावाचा फोन आला आणि त्याला बोलाविले. भीमनगर वॉर्ड परिसरात रितेश गेला असता त्याला बंटी जयराज आणि त्याच्या दोन भावंडांनी वाद करीत हातापायावर सबलीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here