हिंदी विश्वविद्यालयात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त समता रॅली ; कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन

वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात सोमवार, 14 एप्रिल रोजी समता रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व पंचशील ध्वज दाखवून करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून निघालेल्या या रॅलीत मार्गामध्ये आचार्य तुलसी, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, महामना पं. मदन मोहन मालवीय व महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीचा समारोप बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवनाच्या प्रांगणात, त्यांच्या अध्ययनरत पुतळ्यापाशी झाला. यानंतर सहभागी सदस्यांसाठी भोजन दानाचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीत कुलसचिव प्रो. आनंद पाटील, डॉ. राजेश लेहकपुरे, डॉ. मीरा निचळे, डॉ. सीमा बर्गट, डॉ. हेमचंद्र ससाने, डॉ. शैलेश कदम, डॉ. प्रदीप, डॉ. संदीप सपकाळे, डॉ. धीरज मसराम, बी.एस. मिरगे, राजेश अरोरा, रामप्रसाद कुमरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here