सहा बियाणे कंपन्याविरुद्ध खटला दाखल! कृषी निविष्ठा विक्रीवर बंदी; ४१ बियाणे आढळले सदोष, ४२१ बियाण्यांची तपासणी

वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशक विक्री करणा या कंपनी किंवा कृषी केंद्रांकडून शेतक यांची फसवणूक होऊ नये, म्हणून ९ भरारी पर्थकांकडून तपासणी करण्यात आली. बियाण्याचे ४१, रासायनिक खाताचे १ व कीटकनाशकाचे ६ नमुने सदोष आढळल्याने ७४ लाख ३३ हजार कृषि निविष्ठा विक्री बंदचे आदेश देण्यात आले. तसेच सहा बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला.

जिल्ह्यात एकूण १ हजार २९२ कृषी केंद्र असून आतापर्यंत १ हजार २२७ कृषी केंद्रांची तपासणी केली. तपासणीत ४२१ बियाण्यांचे नमुने घेऊन बीज प्रशिक्षण शाळा, नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यापैकी ४१ बियाण्यांचे नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यात १५ न्यायालयीन खटला व २६ ताकीदपात्र असल्याने ४१ ही बियाणे कंपन्या व कृषी केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावली. ६ बियाणे कंपनी व कृषी केंद्र धारकाविरुद्ध न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला असून उर्वरित ९ दिरुद्धची कार्यवाही सुरु आहे. अप्रमाणित झालेल्या १७ लाख ५८ हजार रुपयांच्या ४१ बियाण्यांची विक्री बंदचे आदेश देण्यात आले, अशी माहिती असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here