अतिक्रमणाची तक्रार करा अन् विसरा; चार महिन्यांत तक्रारी २१; धडक कारवाया केवळ १२

वर्धा : सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या वर्धा शहरातील प्रमुख मार्गांवर काही ठिकाणी छोट्या तर काही ठिकाणी मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने रस्तेच अरुंद झाले आहेत. शहरात हळूहळू का होईना पण पाय पसरविणारे हे अतिक्रमण एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारे असल्याने काही नागरिक थेट नगरपालिका प्रशासनाला याची तोंडी व लेखी माहिती देतात. त्यावर नगरपालिका प्रशासन धडक कारवाईही करीत असले तरी मागील चार महिन्यात केवळ शहरातील केवळ १२ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे मागील चार महिन्यांच्या काळात वर्धा नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमणाबाबत २१ तक्रारी प्राप्त झाल्या असून उर्वरित अर्जांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेळीच धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here