रत्नापूर शिवारात शेड जळाले! शेतकऱ्याला ७० हजारांचा फटका

चिकणी : देवळी तालुक्यातील काजळसरा येथील शेतकरी मारोतराव वामन बिजवार यांच्या मालकीच्या मौजा रत्नापूर शिवारातील शेतीमधील शेड अचानक लागलेल्या आगीत जळून कोळसा झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली असून, यात शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान झाले आहे.

शेतकरी बिजवार यांनी शेतीउपयोगी साहित्य ठेवण्यासाठी शेतातच शेड उभारले होते. अचानक लागलेल्या आगीत शेडमधील दोन स्प्रेपंप, दोन ताडपत्री यांसह विविध साहित्य जळून कोळसा झाले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. झालेल्या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here