मोहन सुरकार
सिंदी (रेल्वे) : महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या संकल्पनेतुन सिंदी शहरात शनिवारी (ता. ११)ला गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्या निवारण केंद्राची बस स्थानक चौकात सुरवात करण्यात आली.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख जयंत तिजारे प्रामुख्याने उपस्थित होते. या समस्या निवारण केंद्रात आज पहिल्याच दिवशी २० तक्रारीचे निवारण करण्यात आले. शेतकरी शेतमजूर कामगार व इतर तक्रारी, धडक सिंचन विहीर प्रलंबित अनुदान, पांदन रस्ते, घरकुल समस्या व सनद समस्या व इतर समस्या लेखी स्वरूपात स्वीकारून त्यावर संबंधित अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे वरील समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे सांगण्यात आले.
श्री.कुबडे यांच्या हिंगणघाट येथील तक्रार निवारण केंद्राच्या भरघोस प्रतिसाद आणि यशा नंतर आता शुक्रवार (ता.११) पासुन ला दर पंधरवाडी महिन्यातील दुसरा व चौथ्या गुरुवारला सिंदी (रेल्वे) येथे समस्या (तक्रार) निवारण करण्यात येईल,
या समस्या (तक्रार)निवारण केंद्राचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मंगल सोनटक्के, सेलू तालुका प्रमुख हंसराज बेलखोडे व शहर प्रमुख सुरज आष्टनकर यांनी केले. यावेळी शहरातील प्रहार जनशक्ती पक्षाचे शुभम गोल्हर, अभिषेक बडवाईक, शुभम सुरकार, कैलास उईके, मनोजराव साटोने, तेजस सोनटक्के, वैभव मुंडले, प्रकाश तिमांडे, किशोर वडांद्रे व तक्रारदार व शहरातील नागरिक उपस्थित होते.