Home जिल्हा वर्धा वर्ध्यात पारा @ ४३.५ अंशांवर ; उष्णतेचा तडाखा वाढला

वर्ध्यात पारा @ ४३.५ अंशांवर ; उष्णतेचा तडाखा वाढला

वर्धा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेने कडाक्याचा तडाखा दिला असून मंगळवारी (दि.१४) कमाल तापमान तब्बल ४३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात उकाड्याची तीव्रता जाणवू लागली आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे तापमानात काहीशी घट झाली होती. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असून उष्ण व कोरडे वारे वाहत आहेत. परिणामी, नागरिकांना दिवसभर उष्म्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दुपारच्या सुमारास शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा व चौकांमध्ये वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र दिसून आले. कडक उन्हामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळल्याचेही आढळले. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुरेसे पाणी पिणे, थेट उन्हात जाणे टाळणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आदी उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उष्णतेचा हा वाढता कहर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!