

वर्धा : भारत सरकारच्या स्वस्थ भारत अभियानांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्देशित केलेल्या स्वस्थ भारत सप्ताहांतर्गत विद्यापीठात शुक्रवार, २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता स्वस्थ भारत शर्यत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या फादर कामिल बुल्के आंतरराष्ट्रीय वसतिगृहापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा समारोप दीड किलोमीटरचे अंतर पार करून साबित्रीबाई फुले महिला वसतिगृह येथे झाला. शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रो. फरहद मलिक यांनी शर्यतीला हिरवी झंडी दाखवला. धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी बोलताना प्रो.फरहद मलिक म्हणाले की, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या स्वरथ भारत अभियानांतर्गत सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, या अंतर्गत आपण भारताला निरोगी बनविण्याचा संकल्प केला पाहिजे. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना निरोगी भारताची शपथ दिली. प्रो. मलिक व डॉ. जयंत उपाध्याय यांचे सूतमाळा व रोपटे देऊन करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा समितीचे सचिव तथा आयोजन समितीचे सहसमन्वयक डॉ. अनिकेत आंबेकर यांनी केले. या स्पर्धेत पुरुष गटात भाषा विद्यापीठाचा विद्यार्थी रवि कुमार प्रथम, शिक्षा विद्यापीठाचा सुमित चव्हाण द्वितीय आणि शिक्षा विद्यापीठाचा सौबिक सेन गुप्ता तृतीय आला. महिला गटात शिक्षण विद्यापीठाची त्रिवेणी इवने प्रथम, साहित्य विद्यापीठाची रिया द्वितीय, वर्धा समाज कार्य संस्थेची ब्यूटी कुमारी हिने तृतीय क्रमांक पटकावला.
या प्रसंगी डॉ. बालाजी चिरडे, डॉ. सतीश पावडे, डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. शैलेश कदम, डॉ. संदीप सपकाळे, डॉ. हेमचंद्र ससाणे, डॉ. वरूण उपाध्याय, डॉ. कोमल परदेशी, डॉ. गिरीशचंद्र पांडे, डॉ. प्रमोद जोशी, डॉ. धीरज मसराम, डॉ. गीता साहू, डॉ. अभिषेक सिंह, डॉ. हेमंत धामट, आनंद भारती, डॉ. अंजनी कुमार राय, राजीव पाठक, बी. एस. मिरगे, संगीता मालवीय, कमल शर्मा, वैभव सुशील, सुधीर खरकटे, मिथिलेश कुमार राय, प्रीती खोडे, सुनीता तडस, नीतू सिंह आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यम अधिकारी, प्रवीण झाडे, भूषण साळवे, सचिन आडे, योगेश नखले, गजानन, नितीन, संदीप पेटकर, श्रीकांत, प्रमोद आदींनी सहकार्य केले.