जिल्ह्याच्या सीमांवर लागलेत चेक पोस्ट! १२ प्रभारी पथकांचा वॉच : पोलिस विभाग अलर्ट मोडवर

वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस विभाग अलर्ट माेडवर आहे. जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट लागले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १२ प्रभारी पथकांसह १२ स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (एसएसटी)कडून कडी नजर ठेवण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातून बाहेरील जिल्ह्यातून येणार्‍या प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील आर्वी, वर्धा देवळी व हिंगणघाट या चार विधानसभा क्षेत्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत चुनाव आयोगाने कार्यक्रम घोषित केल्यानंतर १५ आॅक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडूनही पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर चेक पोस्ट लावण्यात आले आहे. या ठिकाणी सुरक्षतेच्या दृष्टीने पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे. बाहेर जिल्ह्यातून येणार्‍या वाहनांची तपासणू करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण २७ पथके तैनात करण्यात आली आहेत. पथके विविध ठिकाणी पोहोचून अवैध धंदे, गुन्हेगारी कारवाया, सट्टेबाजी, जुगारअड्डे, दारू विक्रेत्यांवर नजर ठेवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here