घरातून पलायन केले, विहिरीत उडी घेऊन दोघानीही जीवन संपविले! प्रेमीयुगुलांच्या आत्महत्येने खळबळ; पारडी गावातील घटना

तळेगाव (श्या.पंत) : कारंजा (घाडगे) तालुक्‍यातील पारडी येथील प्रेमीयुगुलांनी काही दिवसांपूर्वी पलायन केले होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. शनिवारी त्या दोघांचेही मृतदेह शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

पारडी येथील रहिवासी हर्षल बाबा वाघाडे (२२) याने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीला २२ जानेवारीला फुस लावून पळवून नेले होते. मुलीच्या घरच्यांनी एक दिवस सर्वत्र शोध घेतला पण, तिचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी २३ जानेवारीला तळेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या दिवशीपासून तळेगाव पोलिस दोघांचाही शोध घेत होते. शनिवार 3 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता दरम्यान पारडी येथील गणेश रंगारी यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. याची माहिती पारडीच्या पोलिस पाटलांना मिळाली. त्यांनी लागलीच तळेगाव पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर जाऊन मृतदेह विहिरी बाहेर काढले त्यानंतर ओळख पटविण्यासाठी बेपत्ता असलेल्या प्रमीयुगरालाची चौकशी केली. तेव्हा बेपत्ता असलेल्या मुला- मुलींची ओळख पटली. दोघांनी ओढणीने पाय बांधून विहिरीत उडी घेतल्याचे निदर्शनास आले. मृतदेह कुजलेले असल्यामुळे जागेवरच नातेवाईकांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात जमादार निखिल काळे व अतुल अडसड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here