अधिकृत केंद्रातूनच पीयूसी काढा, नाही तर होईल दंड! आरटीओ सक्रिय; जवळपास दीड हजारांवर वाहनांची तपासणी

वर्धा : वाहन चालवताना काही प्रमुख कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्यातच पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल) ची कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे. वर्धा प्रादेशिक परिवहन विभागाने जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत तब्बल दीड हजारांवर वाहनांची तपासणी केली असून यात साडेपाचशे ते सहाशे वाहने दोषी आढळून आल्याने त्यांच्याकडून जवळपास साडेचार लाखांवरील दंड वसूल केला आहे.

दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविताना आपल्यासोबतच पीयूसीचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक सहा महिन्याला या प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र आपल्या वाहनाच्या प्रदूषणाची पातळी किती आहे, याबाबत माहिती देत असते. हे प्रमाणपत्र नसल्यास हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची रक्‍कम भरावी लागते. यासोबतच वाहनाचा विमा काढायचा असल्यास पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, हे प्रमाणपत्र अधिकृत केंद्रातूनच काढणे जरजेचे आहे. अन्यथा विम्याची रक्‍कम तसेच अन्य गोष्टींसाठी डोकेदुखी ठरत असते. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांकडून जिल्ह्यात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो आहे. त्यामुळे नागरिकांनीही कागदपत्रे जवळ बाळभावी, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here