घर गाठण्याआधीच काळानं गाठलं, पुलावर पाय घसरल्याने कोसळून ठार! धाम नदीच्या पुलावरील घटना

आंजी (मोठी) : शेतातून सोयाबीनची मळणी करून घराकडे परत येत असतांना धाम नदीच्या पुलावरून पाय घसरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी आंजी येथे घडली असून गावात हळहळ व्यक्‍त होत आहे.

महादेव माधव गोमासे (६४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते राज्य मार्ग वाहतूक महामंडळातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेती सांभाळायला सुरुवात केली. गुरुवारी ते शेतात सोयाबीनची मळणी करण्यासाठी गेले होते. काम आटोपल्यानंतर, घराकडे परत येत असताना धाम नदीवरील पुलावर असलेल्या दगडावरून पाय घसरून खाली कोसळले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. याप्रकरणी आंजी पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक सानप यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह रुग्णालयात पाठवून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here