वर्धा : भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित कार होत थेट उड्डाणपुलावरून रेल्वेपटरीवर कोसळली. या अपघातात एकाच कुटुंबातील सदस्य होते. या अपघातात 5 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. ही घटना जाम-नागपूर महामार्गावरील बोरखेडी शिवारात घडली. या अपघातात श्रेया बैस (29), कवीशा काकडे (27), ब्नोनदूत रोगो (24, रा. नागपूर), मोहम्मद सादिक (32, हैदराबाद), साईद युसूफ (35, हैदराबाद) असे पाच जण गंभीर जखमी झाले.
हैदराबाद येथून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाब कार जिल्ह्याच्या सिमेवरील बोरखेडी शिवारात उड्डाणपुलावरून थेट रेल्वे पटरीवर पडली. कारच्या चालकास डुलकी लागल्याने अपघात घडल्याचे सांगितले जाते. यावेळी एकाच कुटुंबातील सदस्य कारमध्ये होते. कार खाली कोसळल्याने कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्गावरील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बुट्टीबोरी येथील माया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातग्रस्त कार रेल्वेरूुळावर पडल्याने काहीकाळ रेल्वेची वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. झोपेची डुलकी लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती जाम महामार्ग पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी दिली आहे.