कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

समुद्रपूर : कर्जबाजारी झालेल्या 45 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास समुद्रपूर तालुक्‍यातील रेणकापूर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी सुरेश तुकाराम मडावी (वय 45) यांनी दुपारच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. सुरेश यांच्याकडे तीन भावांची मिळून एकूण सहा एकर शेती आहे. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून विविध नैसर्गिक संकटामुळे उत्पादन घटल्याने दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढतच गेला. मृतक शेतकरी सुरेश यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. याशिवाय खासगी सावकारांची देणी कशी द्यावी, या विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here