किरकोळ वादातून दोन कुटुंबांत हाणामारी! अल्लीपूर ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल

वर्धा : घर बांधकामाच्या वीटा नेत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन कुटूंबामध्ये शिविगाळ करून हाणामारी झाली. ही घटना 6 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 7 वाजताच्या दरम्यान मौजा येरणवाडी येथे घडली. या प्रकरणी परस्पर एकूण सात जणांविरुद्ध अल्लीपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात सुलोचना रवींद्र सोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिपाली गौतम भालेराव, गौतम नथ्थजी भालेराव प्रशिक गौतम भालेराव तिन्ही रा. येरणवाडी यांच्याविरुद्ध तर दिपाली गौतम भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकांत सोगे, संकेत सोगे सलोचना सोगे व सविता श्रीकांत सोगे रा. सर्व येरणवाडी यांच्याविरुद्ध अल्लीपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here