राज्यात ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता ‘या’ जिल्ह्यांना अ‌लर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. मात्र, आता आणखी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस जोरदार वारे वाहतील. तसेच अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌लर्ट जारी करण्यात आला आहे. आज १२ सप्टेंबरला सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट तर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदियाला यलो अ‌लर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी १३ सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌लर्ट, तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. दरम्यान, १४ सप्टेंबरला पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌लर्ट, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अलर्ट दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here