साहूर : सततच्या पावसामुळे सावंगा पुनर्वसन (साहूर) येथील शेतकरी महादेव मारुती नांदणे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. परिणामी, कुटुंबीय उघड्यावर आले आहे.
या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये त्यांचे अंदाजे ४० हजारांचे नुकसान झाले. पटवारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महादेवराव नांदणे केली आहे. शासनाच्या मदतीची त्यांना प्रतीक्षा आहे.