

वर्धा : शेळ्या घेऊन जाणारा मिनीट्रक चालकाचे स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पुलावरुन उतरताना उलटला. यात ट्रकखाली दबून दोघांचा मृत्यू झाला तर ४० शेळ्या मृत्युमुखी पडल्या. हा भयावह अपघात शुक्रवर ता. १८ मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास वर्धा ते नागपूर रस्त्यावर असलेल्या सक्षम शाळेसमोर झाला. श्याम मारोती नेहारे (२५ वर्षे) रा. मुसळ ता. कळंब जि. यवतमाळ), राजू हरी मेश्राम (४५ वर्षे) रा. वाढोणा ता. कळंब जि. यवतमाळ) अशी मृतकांची नावे आहे.