

पवनार : महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ बुधवार (ता. १२) धाम नदीच्या तिरावर दरवर्षी ब्रम्हविंद्या मंदिर परिसरात यात्रा भरते महात्मा गांधींच्या स्मृतींना या माध्यमातुन उजाळा दिला जातो. मोठ्या संखने या यात्रेत परिसरातील नागरीक येतात. मात्र दिवसेनदिवस या यात्रेचे स्वरूप बदलत चाललेले आहे. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत अनेक हुल्लडबाज दारूच्या नशेत महिला व मुलींची छेड काढत असल्याचे चित्र दिसून येते त्यामुळे या यात्रेचे पवित्र आणि श्रद्धेला गालबोट लागल्या जात आहे.
महात्मा गांधी यांची ३० जानेवारीला हंत्त्या झाली त्यानंतर भुदान चळवळीचे प्रनेते आचार्य विनोबा भावे यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व सर्वोदयी कार्यकर्ते पवनार येथील ब्रम्हविंद्या मंदीर परिसरात एकत्र आले. महात्मा गांधींच्या हत्त्तेच्या तेराव्या दिवशी १२ फेब्रुवारीला धाम नदीपात्रात त्यांच्या अस्ती विसर्जीत करण्यात आल्या. गांधींच्या हत्तेनंतर सर्वोदयी कार्यकर्ते विनोबा भावे यांच्याकडे आशेने पाहु लागले होते. त्यांच्या नेतृत्वात ऐकत्रीत येत ब्रम्हविंद्या मंदीर परिसरात दरवर्षी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत होते. त्यानंतर दरवर्षी देशभरातील शेकडो सर्वोदयी कार्यकर्ते महात्मा गांधींना अभिवादन करण्याकरीता या दिवशी ऐकत्रीत येत होते. कालांतराने गावातील व परिसरातील नागरीकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि याला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले.
मात्र दिवसेनदिवस या सर्व गोष्टींचा नागरिकांना विसर पडत चाललेला असुन या यात्रेचे स्वरुप बदलत चाललेले आहे. यात्रेत हवस्या, गवस्यांची नुसती गर्दी वाढत चाललेली आहे. यात्रेत अनेक दुकाणे लावण्यात येत असुन खरेदीकरीता मोठी गर्दी या यात्रेत पहायला मिळते मात्र या गर्दीचा फायदा घेत अनेक हुल्लडबाज या ठिकाणी गोंधळ घालताना दरवर्षीचा अनुभव आहे. यात्रेत छेडखानीचे अनेक प्रसंग घडत असल्याचे दरवर्षी घटना घडत असतात. अनेक टोळके महिला मुलींची छेड काढण्याच्या हेतूने या यात्रेत प्रवेश करतात. त्यांच्या कानाजवळ जात भोंगे वाजवण्याचा प्रकार सातत्याने या यात्रेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिला मुली या यात्रेत येण्याचे टाळताना दिसत आहे.
प्रतिक्रिया….
मागील काही वर्षात या यात्रेचे चित्र बदलले आहे. यात्रेच्या निमित्ताने गावात येणारे पाहुणे दारूच्या नशेत राहतात, त्यातून वाद निर्माण होत भांडण होतात हे आता बदलण्याची गरज आहे. त्यामुळे या दिवशी गावातील दारू आणि मास माच्छिची दुकाने पूर्णपणे बंद ठेवत पोलिसांनी यात्रेत विशेष बंदोबस्त लावणे गरजेचे आहे.
बबलू राऊत, बजरंग दल जिल्हा संयोजक वर्धा