वर्धा : सावत्र मुलगा घरी का आला, या कारणातून वाद करीत पतीने विवाहितेस मारहाण केली. दयालनगर परिसरात ही घटना घडली. सुनीता दुबे हिचा विवाह गंगाप्रसाद दुबे याच्याशी झाला होता. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने विवाहितेने त्याच्याशी घटस्फोट घेतला.
त्यानंतर सुनीताने सागर तिवारी याच्याशी विवाह केला. पहिल्या पतीपासून झालेला सूरज नामक मुलगा सुनीताच्या घरी आल्याने संतापलेल्या सागर तिवारी याने तुझे नातेवाईक घरी आले पाहिजे नाही, असे म्हणत मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.