२० तासांनंतर सापडला शेतकऱ्याचा मृतदेह

आर्वी : शेतीत पिकाची फवारणी करण्यासह उभ्या पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतात जात असलेला शेतकरी सचिन बाबाराव लांडे हे बाकळी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात रविवारी वाहून गेले. ही बाब उघडकीस येताच पोलीस व महसूल विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. तब्बळ २० तासांनंतर सचिन लांडे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

आर्वी तालुक्यातील शिरपूर येथे रविवारी घडल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध घेत असतानाच म्राटोडा बेनोडा येथील बंधाराजवळ सोमवारी सकाळी शेतकरी सचिन लांडे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी माटोडा बेनोडा बंधारा गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनाअंति पोलिसांनी सचिनचा मृतदेह सचिनच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here