वर्धा : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र आता दहावीच्या गुणांच्या आधारेच प्रवेश घेण्यात यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी उच्च न्यायालयाने रद्द करण्यात आली आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. या सीईटीसाठी प्रवेश अर्जही लाखो विद्यार्थ्यांनी दाखल केले होते. मात्र अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांवरच करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.