

वर्धा : जिल्हा परिषदेतील एका विभागामध्ये हिंगणघाट पंचायत समितीमध्ये काही दिवसांकरिता बोलाविलेल्या निविदा लिपिकाला शहरातील कंत्राटदाराने आरती चौकात बोलावून चांगलाच चोप दिला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुप्नारास घडली असून बुधवारी सकाळपासून कंत्राटदारांसह जिल्हा परिषदेत चांगलीच चर्चा रंगली होती. याप्रकरणी पोलिसात तक्रार केली नसल्याने आश्वयर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागामध्ये काही दिवसांपूर्वी मार्च एणिडंगपूर्वी कामांच्या निविदा करण्याचे कारण पुढे करीत हिंगणघाट पंचायत समितीमधून दोन लिपिक दीड महिन्याच्या कालावधीकरिता उसनवारी बोलाविले आहे. या लिपिकाला काम मॅनेज करुन देण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून आग्रह धरला जात होता; पण, ते काम दुसऱ्याला देण्यात आल्याने, कंत्राटदार आणि लिपिकांमध्ये वादाची ठिणगी पडली, अशी माहिती पुढे आली आहे. यातूनच कंत्राटदाराने सदर लिपिकाला आरती चौकामध्ये बोलावून चांगलाच चोप दिल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेला जि.प.तून दुजोराही मिळाला. ही वेळ उसनवारी लिपिकावरच का आली? रात्रीली जाण्याचे कारण का? असे प्रश्न उपस्थित होत आहे.