थकीत कर्जाचा एकरकमी भरणा केल्यास व्याजात 50 टक्के सवलत

वर्धा : थकीत कर्ज रक्कमेचा व्याजासह एक रकमी भरणा करणा-या लाभार्थ्यांस आता व्याज रकमेत 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी एक रकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचेवतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थ्यांकडून कर्ज वसुलीसाठी ही योजना राबविण्यात येत असून सदर योजना 31 मार्च 2024 पर्यंत सुरु राहणार आहे. सर्व योजनांतर्गत कर्ज खाते बंद करु इच्छिणारे लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here