

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेद्वारे अनुदानित आणि विश्वविद्यालयाच्या वर्धा समाज कार्य संस्थानच्या वतीने आयोजित सामाजिक संरक्षण विषयावर सामाजिक कार्य शिक्षकांसाठी तीन दिवसीय (26-28 डिसेंबर) प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलतांना कुलगुरू प्रो. कृष्ण कुमार सिंह म्हणाले की, सध्याच्या काळात अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होत असून त्यामुळे सामाजिक जडणघडण प्रभावित होत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक सुरक्षा हे अत्यावश्यक साधन ठरत आहे. सामाजिक सुरक्षेशी संबंधित कायदे आणि उपाययोजना जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. गुरूवारी दत्तोपंत ठेगडी सभागृहात गुरूवारी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विशेष वक्ता म्हणून मातृसेवा संघ नागपूरच्या समाजकार्य विभागाचे प्रो. केशव वाल्के म्हणाले की राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था ही वृद्धाचे कल्याण, मानवी तस्करी, तृतीयपंथी आणि भिकारी यांच्या कल्याणाबाबत समाजात जागृती करण्याचे काम करते. समाजात प्रचलित समस्यांवरील उपायांवर चर्चा करताना ते म्हणाले की, या समस्या सोडविण्यासाठी समाजकार्य शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आदी राज्यातील 40 हून अधिक शिक्षक सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाषण वर्धा समाज कार्य संस्थेचे निदेशक तथा कार्यक्रमाचे समन्वयक प्रो. बंशीधर पांडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन, सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आणि कुलगीताने झाली तर राष्ट्रगीताने सांगता झाली. डॉ. जगदीश नारायण तिवारी यांनी प्रास्ताविक केले. संचालन सहायक प्रोफेसर डॉ. शिवसिंह बघेल यांनी केले तर आभार डॉ. के बालराजू यांनी मानले. यावेळी विधि विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. जनार्दन कुमार तिवारी, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. जयंत उपाध्याय, डॉ. वागीश राज शुक्ला, डॉ. विजयकुमार सिंह, डॉ. अभिषेक सिंह, जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रोफेसर डॉ. शिवाजी जोगदंड, डॉ. गजानन निलामे, डॉ. ज्योती कुमारी, डॉ. अभिषेक सिंह यांनी सहकार्य केले.